• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी टिकली घेऊन लगेच येते; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, नेमकं काय घडलं?

August 30, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात एक धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवले आणि लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी नववधू बाजारात खरेदीच्या बहाण्याने निघून गेली. “मी टिकली घेऊन लगेच येते,” असे सांगून तिने स्त्रीधन म्हणून घेतलेले दीड लाख रुपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पलायन केले. या प्रकरणात नवरी, तिची आई आणि दोन मध्यस्थांनी नवरदेवाकडील मंडळींचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. घटना १७ ऑगस्ट रोजी घडली असून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सहा जणांविरोधात तक्रार दाखल

तक्रारदार संदीप सुभाष रगडे (वय ३३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, तिसगाव) यांनी सहा जणांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रगडे यांचे शेजारी बाबासाहेब देवरे यांच्याशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत देवरे यांनी स्वाती देवरे या तरुणीसोबत रगडे यांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. ११ ऑगस्ट रोजी विवाह ठरला होता, पण तो न झाल्याने १२ ऑगस्ट रोजी रगडे यांच्या तिसगाव येथील घरी विवाह संपन्न झाला. विवाहासाठी संबंधितांनी खर्चाच्या नावाखाली रगडे यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये, सुमारे तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि इतर दागिने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

लग्नानंतर तिसऱ्या दिवशी स्वाती हिच्यासोबत संदीप रगडे हे बजाजनगरात खरेदीसाठी गेले होते. मोहटादेवी मंदिराजवळील एका दुकानातून कपडे व इतर साहित्य खरेदी केल्यानंतर टिकली घेण्यासाठी जाते, असे सांगून नवविवाहिता दुकानाबाहेर गेली. बराच वेळ झाल्यावर त्यांनी शोध घेतला, पण ती सापडली नाही. तेव्हापासून ती परत आलेली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचा दावा रगडे यांनी केला आहे. या प्रकरणात बाबासाहेब देवरे, अमोल म्हस्के, नितीन दाभाडे, स्वाती रमेश देवरे, रमेश ज्ञानोबा देवरे आणि मीराबाई रमेश देवरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यापूर्वीही घडली होती अशी घटना

नऊ महिन्यांपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील एका युवकाला याच पद्धतीने बजाजनगरात जाळ्यात ओढण्यात आले होते. तेथे छत्रपती संभाजीनगर कोर्टात १०० रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून तीन लाख रुपये (१.४५ लाख फोन पे + १.५५ लाख रोख) उकळले गेले होते. त्यानंतर चारचाकीतून गावी जात असताना पांढऱ्या कारमधून आलेल्या साथीदारांनी गाडी अडवून नववधूला पळवून नेले होते. त्यामुळे वाळूज परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही हे स्पष्ट होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in