• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांनी घरातच राहावे, नाहीतर अनर्थ ओढवेल; इस्लामिक विद्वानाचे वक्तव्य चर्चेत, बुरखा आवश्यक असल्याची मागणी

August 31, 2026 by admin Leave a Comment


इस्लामी विद्वानांच्या एका संघटनेने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना इस्लामी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि ज्या पुरुषांशी तरुणींचे कौटुंबिक संबंध नाहीत, त्यांच्यासोबत त्यांना सार्वजनिक रस्त्यांवर आणि व्यासपीठांवर आणणे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अपीलवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसचे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कठोर सूचना दिल्या

नेत्यांनी स्पष्ट केले की, सर्व धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव केवळ धार्मिक मर्यादा व नियमांच्या चौकटीत राहूनच आयोजित केले जावेत. त्यांनी विविध संस्था आणि मदरशांच्या व्यवस्थापकांना कठोर सूचना दिल्या आहेत. या सुचनांमध्ये कोणताही सार्वजनिक उत्सव धार्मिक मर्यादांचे उल्लंघन करणार नाही, हे सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी आहे असे म्हटले आहे. हे विधान समोर आल्यानंतर केरळच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात महिला स्वातंत्र्य आणि रूढीवादी विचारसरणीबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

‘समस्त केरळ जमीयतुल उलेमा’च्या कंथापुरम गटाने केली अपील

राज्यातील सुन्नी-शाफई इस्लामी विद्वानांची प्रमुख परिषद ‘समस्त केरळ जमीयतुल उलेमा’च्या कंथापुरम गटाने ही अपिल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धार्मिक उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये निर्धारित मर्यादा पाळल्या जाव्यात. अलीकडेच जारी केलेल्या एका निवेदनात समस्त केरळ जमीयतुल उलेमाचे अध्यक्ष ई. सुलेमान मुसलियार आणि महासचिव कंथापुरम ए. पी. अबूबकर मुसलियार यांनी लोकांना आवाहन केले की, धार्मिक मर्यादांचे उल्लंघन करून आयोजित होत असलेल्या इस्लामी उत्सव आणि समारंभांच्या कोणत्याही घटनेला गांभीर्याने घ्यावे.

रविवारी कोच्चीमध्ये एका इस्लामिक कॉन्फरन्समध्ये बोलताना कंथापुरम म्हणाले की, महिलांना सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने “मोठा विनाश” होईल आणि दावा केला की, इस्लामने हे रोखण्यासाठी महिलांसाठी पर्दा अनिवार्य केला आहे. ते म्हणाले, “महिलांना अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने मोठा विनाश होतो, हे जाणून इस्लामने महिलांसाठी पर्दा अनिवार्य केला आहे. पवित्र कुरानमध्ये म्हटले आहे की, महिलांनी आपल्या घरातच राहावे आणि सार्वजनिकरीत्या समोर येऊ नये.”

कांथापुरम म्हणाले की, ज्ञानी धार्मिक विद्वानांनी, विशेषतः समस्त नेत्यांनी, गेल्या १०० वर्षांपासून अशा गोष्टी शिकवल्या आहेत. ते म्हणाले, “म्हणून, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की सर्व ज्ञानी लोकांनी, विशेषतः समस्त नेत्यांनी, १०० वर्षांपासून हे शिकवले आहे आणि म्हणूनच या देशातील महिलांनी आपला मान आणि प्रतिष्ठा जपली आहे.”

नेत्यांनी विशेषतः सांगितले की, तरुण महिलांना सार्वजनिक रस्त्यांवर आणि व्यासपीठांवर अनोळखी पुरुषांसोबत एकत्र आणणे, आणि अशा कार्यक्रमांमध्ये इस्लामविरोधी चालीरीती व उत्सवांचा समावेश करणे, हे श्रद्धावानांसाठी अयोग्य असून ते निषिद्ध आहे. त्यांनी महल्लू (स्थानिक मशीद-समुदाय) अधिकारी आणि मशिदी, मदरसे व इतर संस्था आणि संघटनांच्या नेत्यांना सतर्क राहून असे कार्यक्रम इस्लामी नियमांनुसार आयोजित केले जातील याची खात्री करण्याचे आवाहनही केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल
  • पुण्यात रील्स बनवण्याच्या नादात हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in