• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्रात गाजतेय धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांची कहाणी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची 2 दिवसांत तगडी कमाई

June 15, 2026 by admin Leave a Comment


धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. न्याय आणि योग्य मोबदल्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाने प्रशासन व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या न्यायासाठीच्या लढ्याबाबत व्यापक चर्चा घडवून आणली होती. याच सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारा आणि व्यवस्थेविरोधातील सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ नुकताच प्रदर्शित झाला. सामाजिक आशय, वास्तववादी कथानक आणि प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने जबरदस्त कमाईदेखील केली आहे.

समाजातील वंचित, दुर्बल आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या घटकांच्या वेदना, भावना आणि वास्तव यांचं प्रभावी चित्रण ‘द महाराष्ट्र फाईल्स’मध्ये करण्यात आलं आहे. शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी सामान्य माणसाला करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे, शेतकरी आणि उपेक्षित समाजाच्या समस्या यांचं वास्तवदर्शी दर्शन या चित्रपटातून घडतं. धर्मा पाटील यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत, समाजातील अनेक न ऐकल्या गेलेल्या आवाजांना आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य माणसांच्या वेदनांना या चित्रपटातून अभिव्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची कथा न राहता संपूर्ण समाजाच्या भावना आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारा ठरतोय.

दोन दिवसांत जबरदस्त कमाई

‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 12 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दमदार कथा, प्रभावी अभिनय, सामाजिक आशय आणि वास्तवाला भिडणारी मांडणी यांचा उत्कृष्ट संगम असलेला ‘द महाराष्ट्र फाइल्स’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा आणि विचारप्रवृत्त करणारा चित्रपट ठरत आहे.

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. मोठी स्टारकास्ट आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला अधिक उंची मिळाली आहे. ‘सरकार’ आणि ‘विकास’ या संकल्पनांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी किती मर्यादित संबंध असतो, हे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या प्रशासनाच्या उदासीनतेसह रस्ते प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या जमिनींमुळे अनेक कुटुंबांचं आयुष्य कसं विस्कळीत होतं, याचं वास्तववादी चित्रण यात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?
  • दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर अडचणीत, तरूणीने गंभीर आरोप करत पोलिसात नोंदवली तक्रार
  • Lavender Marriage: अरेंज, लव्ह नंतर हा लॅव्हेंडर मॅरेज काय प्रकार आहे ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in