
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना डार्विनमध्ये सुरू आहे. 13 ऑगस्टपासून या सामन्याला सुरूवात झाली असून पहिला बांगलादेशच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं मायभूमीत खेळपट्ट्यांचा अंदाज असल्याने निर्णय योग्य ठरेल असं वाटलं होतं. पण बांगलादेशने सगळे फासे उलटे पाडले. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडवून दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव 198 धावांवर आटोपला. तर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 1 गडी गमवून 96 धावा केल्या होत्या. पण या सामन्यात बांगलादेशला 64 धावांचा अतिरिक्त भार सहन करावा लागला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. स्टीव्ह स्मिथ 7 धावांवर असताना त्याची विकेट मिळाली म्हणून जल्लोष केला. पंचांचा नकार मिळाल्यानंतर रिव्ह्यूही घेतला. पण सर्वकाही ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडलं.
नेमकं काय घडलं आणि स्मिथ काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 गडी गमवून 67 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून 21वं षटक टाकण्यासाठी एबादोत होसेन आला आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर कॅमरून ग्रीनने 1 धाव घेत स्टीव्ह स्मिथला स्ट्राईक दिली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव घालवला. चौथ्या चेंडूवर खेळताना स्टीव्ह स्मिथ चाचपडला आणि थेट विकेटकीपरच्या हाती चेंडू गेला. आवाज आल्याने बांगलादेशी खेळाडूंनी जोरदार अपील केली. पण पंचांनी नाबाद असल्याचं सांगितलं. खरं तर स्टीव्ह स्मिथ मैदान सोडून जाण्यासही तयार होता. बांगलादेशने रिव्ह्यू घेतल्याने बाद असेल त्याला वाटलं. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासलं असता नाबाद असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने स्पष्टीकरणही दिलं.
“Did you nick that?”
“I think so, yeah.”Watch Steve Smith’s full press conference after day one of #AUSvBAN: https://t.co/UPFVhNe5II pic.twitter.com/hzoOHz4xVR
— cricket.com.au (@cricketcomau) August 13, 2026
स्टीव्ह स्मिथने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा त्याला त्या घटनेबाबत विचारलं गेलं. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, मला असंच वाटलं होतं. मी खरंच नशिबवान आहे का? मला असंच वाटतं. कधी कधी तुम्हाला ते स्वीकार करावं लागतं. हे खूप चांगलंही असतं. चेंडूला बॅटला लागला नाही असंही होऊ शकतं. मला माहिती नाही, पण मला नक्कीच काहीतरी जाणवलं होतं. जर मला बाद दिलं असतं तर मी मैदानाबाहेर गेलो असतो. पण मला वाटते की मी आज तंत्रज्ञानामुळे वाचलो.
Leave a Reply