• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मदरसा कुठेही असो, दहशतवादालाच खतपाणी’, भाजप नेत्याचा वक्तव्याने तापले वातावरण, अभ्यासक्रमात मोठा बदल?

August 6, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने देशभरात वातावरण तापले आहे. मदरसा शिक्षण पद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मदरसा कुठलाही असो, त्यामुळे दहशतवादाला खतपाणी मिळते असा दावा त्यांनी केला. त्यावर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर सत्ताधारी भाजपने हा राजकीय विचारधारेशी हे वक्तव्य जोडले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याचवेळी राज्य सरकारने मदरसा शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलाची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यापूर्वीच वातावरण तापवण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. लेखिका तस्लीमा नसरी यांनी कोलकात्यात नुकतेच मोठे वक्तव्य केले होते. मदरसे हे जिहादी घडवणारे कारखाने असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सरकारने हे कारखाने बंद करून धर्मनिरपेक्ष शाळा सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता मौर्य यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

काय म्हणाले केशव प्रसाद मौर्य?

लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हे वक्तव्य केले. मदरसे हे बांगलादेशात असोत की पाकिस्तान आणि भारतात, मदरसे हे एकप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालतात, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक तुटून पडले आहेत. सरकार एका शिक्षण पद्धतीला आणि समुदायाला निशाणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी लावला. तर भाजप नेत्यांनी या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया देताना सरकारची बाजू लावून धरली. सरकारमधील काहींनी सपक तर काहींनी तिखट प्रतिक्रिया दिली.

मदरसा शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलाची तयारी

केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. आता उत्तर प्रदेश सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यात सरकार मदरसा शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलाची तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मदरसामधील डिग्री कोर्स पूर्णपणे बंद करण्याची कॅबिनेटची तयारी आहे. प्रस्तावानुसार, मदरशांमध्ये केवळ इयत्ता 12वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असू शकते. अर्थात सरकारकडून याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जर कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजूरी दिली तर उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण प्रणालीत मोठा बदल होईल.

विधानाला महत्त्व का?

सरकार मदरसा शिक्षण प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत

उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी

तस्लीमा नसरीन यांच्यानंतर लागलीच मदरशांवर वक्तव्य



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in