• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भुजबळांचा गिरीश महाजनांवर संताप, महाजन थेट नाशिकमध्ये; चार ओळीत दिलं उत्तर

July 31, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत, यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी संपात व्यक्त केला होता. जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही असं विधान केले होते. यावर आता गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे.

महाजनांचे भुजबळांना उत्तर…

गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, ‘जबाबदारी माझी आहे, ‘मी कुंभमेळा मंत्री आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? नाशिककरांना त्रास होणार आहे हे मी सांगितले होते. डांबरी रस्ते टिकत नाहीत त्यामुळे व्हाइट टॉपिंग करत आहोत. चाळीस हजार कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहे. एका रोडखाली सात प्रकारची युटिलिटी करत आहोत. सुविधा मिळणार आहे, कॅमेरा लावत आहोत. नवीन आणि मॉडर्न नाशिक आपण करत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील आमच्या शहरासारखे शहर नाही.’

पैशांची चिंता करू नका…

पुढे बोलताना महाजन यांनी म्हटले की, ‘काल दुर्दैवी अपघात झाला. नागरिकांचा रोष आपल्यावर असणे स्वाभाविक आहे. नाशकात रस्त्यांची कामे सुरू आहेत, खोदकाम सुद्धा सुरू आहे. 4 ते 6 महिन्यात कामे पूर्ण करायची आहेत. पर्यायी रस्ते व्यवस्थित पाहिजेत असं मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, खड्डे पडणार नाहीच याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. ठेकेदार रस्ता चांगला ठेवतो की नाही लक्ष ठेवा. खड्डे दिसणार नाही अशी व्यवस्था करायची आहे. दोन ते तीन दिवसांत खड्डे बुजवा. अंबड रस्ता सरसकट चांगला करा. परवानग्या मी देतो पैशाची चिंता करू नका. तात्काळ काम करा, बैठक झाली हीच परवानगी समजा.’

अधिकाऱ्यांना कामावर लक्ष ठेवावे…

पुढे बोलताना महाजन यांनी म्हटले की, ‘कॉलनीतील रस्ते सुद्धा खराब आहे, वेगळा फंड निर्माण करू रस्ते चांगले झाले पाहिजे. थोडे दिवस त्रास होईल, फार दिवस त्रास होणार नाही. खड्डे बुजवतांना माती मुरूम टाकू नका. काम सुरू आणि अधिकारी नाही हे खपवून घेणार नाही. लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकं मृत्युमुखी पडत आहे कुणालाही पाठीशी घालणार नाही. नवा जुना बघणार नाही, कारवाई होईल. अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ट्रॅफिक पोलिसांनी अलर्ट राहावे. खड्ड्यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्या.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in