
आज भारतीय जगाच्या टॉप कंपन्याचे नेतृत्व करीत आहे. याचा आपल्याला अभिमान वाटत आहे, मग भारताची ग्लोबल कन्सलटन्सी फर्म का नाही बनू शकत? आमची अकाऊंटिंग फर्म, लीगल फर्म, फायनान्स फर्म ग्लोबल लीडर का बनू शकत नाही ? त्यामुळे भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये. हे सर्व शक्य आहे. यासाठी तुमच्याकडे नेटवर्कही आहे आणि नॉलेजही आहे. देशात आता नव्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इको सिस्टीम देखील बनली आहे. आता वेळ मोठे लक्ष्य बनवणे आणि त्यांना प्राप्त करण्याचा आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या शताब्दी समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे व्हीजनच सादर केले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply