• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुढील 4 दिवस धो-धो… पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?

July 23, 2026 by admin Leave a Comment


गेले काही दिवस राज्यातील पानसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र आता राज्यातील विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाबाबत नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट

पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस डी सानप यांनी राज्यातील हवामानाबाबत माहिती दिली आहे. सानप यांनी सांगितले की, 25 जुलै पर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक धरणे भरण्याची शक्यता आहे. पावसाला सुरवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी कृषीतज्ञांना सल्ला घेऊन पेरणी करावी असे आवाहन सानप यांनी केले आहे. तसेच पावसासंदर्भात माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत या अँपचा वापर करावा असंही सानप यांनी म्हटलं आहे.

कोकणात 5 दिवस पावसाची शक्यता

दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे किनारपट्टीकडे येत आहे त्यामुळे पुढचे काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे पाच दिवस कोकणात पावसाच्या सरी बरसणार आहेत.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढला असल्यामुळे किनारपट्टी भागात ताशी 50 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य की खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in