
नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभराची झोप उडवून ठेवली होती. यामध्येच सीजेपीचं आंदोलन, मंत्र्यांच्या भेटीगाठी अशा अनेक जलद घडामोडी घडल्या. अशात आता २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत बोलताना भाजप मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, “हे अत्यंत महत्त्वाचे बिल आहे, विरोधकांनी सहकार्य करावे… या विधेयका अंतर्गत आमच्या सरकारने कडक कायदा आणला आहे. यानुसार कोणत्याही पेपरफुटीचे प्रकरण ५ महिन्यात निकाली काढले जाणार, तसेच यामध्ये अनेक कारावास, दंड आणि इतर कठोर तुरतुदी करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या काळातही अनेक पेपर फुटले आहेत, मात्र कडक कायदा करण्यात आला नाही”. असे जितेंद्र सिंह म्हणाले.
Leave a Reply