
नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तेथील परिस्थिती जाणून घेत अडचणीच्या वेळी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले.
महिला पर्यटकांनी सध्या कोणतीही अडचण नसल्याचे सांगत टूर आयोजक आणि प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याची माहिती दिली. तसेच काठमांडूचा प्रवास रद्द करून सुरक्षित ठिकाणी असल्याचेही त्यांनी शिंदे यांना सांगितले.
Leave a Reply