
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'अरे रे अरे' हे गाणे त्यापैकीच एक आहे.
जवळपास 29 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, त्याची मधुर चाल, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची अप्रतिम केमिस्ट्री तसेच लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे हे गाणं आजही तितकेच ताजेतवाने वाटते.
'अरे रे अरे' हे 'दिल तो पागल है'मधील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यात उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाज दिला आहे.
या गाण्याच्या यशात माधुरी दीक्षितचा मोठा वाटा आहे. तिचे मनमोहक हास्य, प्रभावी हावभाव आणि उत्कृष्ट नृत्य यामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं रेडिओ, कॅसेट आणि संगीत वाहिन्यांवर दीर्घकाळ गाजले. आजही लग्नसमारंभ, संगीत कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते.




Leave a Reply