• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नाट लागलं… शिंदे गटात मोठा अंतर्गत वाद, धुसफूस वाढली; थेट आमदारानेच दिली खळबळजनक कबुली

September 7, 2026 by admin Leave a Comment


शिंदे गटात सर्व काही अलबेल असल्याचं चित्र असलं तरी प्रत्यक्षात मात्र चित्र काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटात अंतर्गत मोठी गटबाजी असल्याचं उघड झालं आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तशी कबुलीच दिली आहे. नंदूरबार शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याचा दावा चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पक्षातील गटबाजी जाहीरपणे उघड झाल्यानंतर पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गटबाजी कशी थोपवतात याकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे.

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मीडियाशी संवाद साधताना या गटबाजीवर भाष्य केलं आहे. दुर्दैवाने शिवसेना पक्षाला गटबाजीची नाट लागली आहे, अशी खंत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षात खूप गटबाजी आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाद आहेत, अशी कबुलीही चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

संपर्कप्रमुखांनी दम द्यावा

तसं पाहिलं तर तळोदा पाव किलोच आहे. पण तिथेही दोन गट आहेत. दोन दुकाने ठेवून आपला पक्ष एवढाच असल्याचं दाखवलं जात आहे. आपण सगळे मिळून पाव किलो असलो तरी लोकांची सेवा करत आहोत, असे रघुवंशी यांनी म्हटलंय. संपर्कप्रमुखांनी सर्वांना बोलावून दम देत आपापसांतील मतभेद मिटवले पाहिजेत. पक्षाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

नंदूरबारमध्ये दुष्काळ जाहीर करा

दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं होतं. नंदूरबारमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळसदृश्य परिस्थिती न जाहीर करता जिल्हा थेट दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी रघुवंशी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.

सध्या जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस होत असून, फवारणी केल्याप्रमाणेच पाऊस पडत आहे. आगामी 8 ते 10 दिवस पाऊस न झाल्यास खरीप पिके करपू लागण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीत पाणी मुरेल, एवढा पाऊस झालेला नसल्याने शासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रघुवंशी यांनी केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
  • Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
  • Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट…
  • Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल
  • Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in