• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशाला हादरवून सोडलेल्या सत्य घटनेवर आधारित 8 एपिसोड्सची सीरिज; जगभरात 1 नंबरवर होतेय ट्रेंड

June 28, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा भंडार आहे कारण दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा वेब सीरिज त्यावर स्ट्रीम होत असतात. मात्र यापैकी काहीच चित्रपट किंवा वेब सीरिज ट्रेंडिंग यादीत अधिक काळापर्यंत टिकून राहतात. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेली अशीच एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज सध्या जगभरात नॉन-इंग्लिश कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा भंडार आहे, कारण दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा वेब सीरिज त्यावर स्ट्रीम होत असतात. मात्र यापैकी काहीच चित्रपट किंवा वेब सीरिज ट्रेंडिंग यादीत अधिक काळापर्यंत टिकून राहतात. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेली अशीच एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज सध्या जगभरात नॉन-इंग्लिश कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

या क्राइम थ्रिलरची खास गोष्ट म्हणजे याची कथा काल्पनिक नसून खऱ्या घटनेवर आधारित आहे. आयएमडीबीवर याला दहापैकी 7.8 रेटिंग मिळाली आहे. या आठ एपिसोड्सच्या सीरिजचं नाव 'राख' असं आहे. गेल्या दोन वर्षांत प्राइम व्हिडीओवरील भारतातील सर्वांत मोठी ओरिजिनल सीरिज ठरली आहे. तसंच ही सीरिज 23 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाली असून 60 देशांमधील टॉप 10 यादीतही तिने स्थान मिळवलं आहे. 12 जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेली ही सीरिज नैतिकता गुन्हा आणि न्याय यांच्यातील गुंतागुंत अत्यंत संवेदनशीलतेने हाताळते.

या क्राइम थ्रिलरची खास गोष्ट म्हणजे याची कथा काल्पनिक नसून खऱ्या घटनेवर आधारित आहे. आयएमडीबीवर याला दहापैकी 7.8 रेटिंग मिळाली आहे. या आठ एपिसोड्सच्या सीरिजचं नाव 'राख' असं आहे. गेल्या दोन वर्षांत प्राइम व्हिडीओवरील भारतातील सर्वांत मोठी ओरिजिनल सीरिज ठरली आहे. तसंच ही सीरिज 23 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाली असून 60 देशांमधील टॉप 10 यादीतही तिने स्थान मिळवलं आहे. 12 जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेली ही सीरिज नैतिकता, गुन्हा आणि न्याय यांच्यातील गुंतागुंत अत्यंत संवेदनशीलतेने हाताळते.

या सीरिजमध्ये अभिनेता अली फजलने त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेनंही आईच्या भूमिकेत उत्तम अभिनय केला आहे. यामध्ये आमिर बशीर वडिलांच्या भूमिकेत असून आकाश मखिजा आणि रामदीप यादव यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली आहे.

या सीरिजमध्ये अभिनेता अली फजलने त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेनंही आईच्या भूमिकेत उत्तम अभिनय केला आहे. यामध्ये आमिर बशीर वडिलांच्या भूमिकेत असून आकाश मखिजा आणि रामदीप यादव यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली आहे.

ही वेब सीरिज 1978 च्या रंगा बिल्ला प्रकरणावर आधारित आहे. या दोघांनी मिळून चोरी अपहरण खून यांसारखे गंभीर गुन्हे केले होते आणि त्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रोसित रॉय दिग्दर्शित 'राख' या सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे अली फजल आमिर बशीर आकाश मखिजा रामदीप यादव दिव्या शर्मा विवान शर्मा अंशुल चौहान राकेश बेदी आणि दिव्येंदु भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत.

ही वेब सीरिज 1978 च्या रंगा बिल्ला प्रकरणावर आधारित आहे. या दोघांनी मिळून चोरी, अपहरण, खून यांसारखे गंभीर गुन्हे केले होते आणि त्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रोसित रॉय दिग्दर्शित 'राख' या सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे, अली फजल, आमिर बशीर, आकाश मखिजा, रामदीप यादव, दिव्या शर्मा, विवान शर्मा, अंशुल चौहान, राकेश बेदी आणि दिव्येंदु भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत.

रंगा आणि बिल्ला यांनी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या दोन्ही मुलांचं अपहरण केलं होतं. या अपहरणादरम्यान बिल्लाने संजयवर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गीता किंचाळू लागली तेव्हा वाटेत कोणीतरी गाडीत दोन मुलांना पाहून गाडीचा नंबर देऊन पोलिसांना कळवलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता. रंगा आणि बिल्लाने संजय ठार मारलं आणि नंतर गीतावर बलात्कार केला. नंतर बिल्लाने गीताच्या मानेवर चाकूने वार केला त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.

रंगा आणि बिल्ला यांनी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या दोन्ही मुलांचं अपहरण केलं होतं. या अपहरणादरम्यान बिल्लाने संजयवर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गीता किंचाळू लागली तेव्हा वाटेत कोणीतरी गाडीत दोन मुलांना पाहून गाडीचा नंबर देऊन पोलिसांना कळवलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता. रंगा आणि बिल्लाने संजय ठार मारलं आणि नंतर गीतावर बलात्कार केला. नंतर बिल्लाने गीताच्या मानेवर चाकूने वार केला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये…
  • माझ्याकडून मोठी चूक झालेली..; चोराच्या चाकूहल्ल्याच्या घटनेवर अखेर सैफची कबुली
  • सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन केला, पहिला धक्कादायक फोटो पुढे, लोहगड बंद..
  • IND vs IRE: 50 नाही तर फक्त 49 धावा, अभिषेक शर्माने पहिल्या टी-20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावून पण आयसीसीने एक धावा केली बाद; नियम काय?
  • Tukaram Mundhe: बाहेर जाऊन धाडी टाकण्यापेक्षा… आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना दाखवला आरसा, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in