• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दगडांवरून फिंगरप्रिंट घेणार अन् आधारशी…सीजेपी आंदोलनाचा तपास दिल्ली पोलीस कसा करतायत? चंद्रकांत पाटील म्हणाले…

July 30, 2026 by admin Leave a Comment


CJP Delhi Protest : आपले आंदोलन संपल्यानंतर आता आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यावर वेगवेगळ्या राज्यात कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन केंद्राने दिले होते. परंतु तरीदेखील केंद्र सरकार हे आश्वासन मोडत आहे, असं म्हणत सीजेपीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, असे असतानाच आता भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्रातील एका पत्रकाराच्या रिपोर्टचा आधार घेत चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी सापडणाऱ्या वस्तूंवरील फिंगरप्रिंट घेऊन त्याच्या मदतीने आंदोलनातील मोठ्या आरोपींची शोध घेत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

तो रिपोर्ट पाहून चक्करच येईल

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी केली आहे. त्यांच्याच आदेशानुसार विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मादतीने हल्ले झाले, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे यावर तुमचे मत काय, असा सवाल एका पत्रकाराने चंद्रकांत पाटील यांना केला. यावरच बोलताना त्यांनी राज्यातील एका पत्रकाराच्या रिपोर्टचा आधार घेत दिल्ली पोलिसांच्या तपासावर भाष्य केले. लोकशाहीत कोणीही आरोप शकतो. लोकशाहीचे हेच खरे सौंदर्य आहे. आरोप केला म्हणजे तो खरा असतो, असा त्याचा अर्थ नसतो. मी काल एका पत्रकाराचा व्हिडीओ पाहिला. तो रिपोर्ट पाहून चक्करच येईल. त्या आंदोलनात किती लोक होते? त्यातील कोण-कोण किती गुन्ह्यांमध्ये सहभागी होते, असे पोलिसांनी विश्लेषण केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारे…

तसेच, पोलिसांनी त्या आंदोलनातील अगदी छोटासा दगडही जमा केलेला आहे. त्या दगडावर बोटाचे साधे ठसे असले तरीही ते आधार क्रमांकाशी लिंक होणार आहेत. त्याच्याच आधारे बहुतेक संबंधित प्रकाराचा तो रिपोर्ट आहे. गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारे त्या आंदोलनात किती होते, याचा तपास केला जाणार आहे, असं विधानही त्यांनी केलं. हा दावा मी करत नाही, एका पत्रकाराच्या रिपोर्टमध्ये ते दिलेलं असून तेच मी सांगतोय, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनाही त्यांचा दावा खरा…

एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी त्यांच्या आधुनिक तंत्राच्या मदतीने त्या आंदोलनात परदेशी लोक किती होते, याची आकडेवारीच समोर आणली आहे. आता पोलिसांनाही त्यांचा दावा खरा असल्याचे सांगावे लागेल. राहुल गांधींनाही त्यांनी केलेले आरोप सत्य असल्याचा पुरावा दाखवावा लागेल, असंही मत पाटील यांनी व्यक्त केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in