
उत्तर नेपाळच्या काही भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. या पूरस्थितीमुळे आतापर्यंत १३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अचानक आलेल्या पुरामुळे बाधित भागातील अनेक भयावह दृश्ये समोर येत आहेत, ज्यात घरे कोसळणे, वाहने वाहून जाणे आणि रस्ते जलमय होणे यांचा समावेश आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सैन्य दलाच्या मदतीने देशभरातील ३,६२० लोकांची सुटका करण्यात आली आहे.
बचाव कार्यासाठी लष्कर आणि सशस्त्र पोलीस दल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. अनेक ठिकाणी लोखंडी पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले आहेत, तर हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले जात आहे.
Leave a Reply