• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे झाले काय?’ सोनम वांगचुक यांनी सांगितली उपोषण सोडतानाची Inside Story, सरकारचा प्लॅन काय?

July 24, 2026 by admin Leave a Comment


Sonam Wangchuk Hunger Strike: अखेर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडले. सरकारने अर्धी लढाई जिंकली आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीसोबत (CJP Protest) सरकार चर्चेची पहिली फेरी करण्याची शक्यता आहे. आंदोलनाची धग देशभरात पोहचली आहे. प्रत्येक शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सरकार आंदोलनाची हवा काढू पाहत असताना विरोधकांनी मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रेटली आहे. वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. त्यावेळी CJP चा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. सरकारचे मोठे धोरण यावरून लक्षात येते. तर प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी वांगचुक यांनी मोठी अपडेट दिली आहे.

कोणत्या मुद्यावर सोडले उपोषण?

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे

20 जुलैच्या मोर्चात सहभागी झालेल्यांवर कारवाई न करणे

NEET पेपरफुटीप्रकरणात संसदेत चर्चा करणार

शिक्षण व्यवस्थेत सुधारणेसाठी सरकार प्रयत्न करणार

या मुद्यांवर एकमत झाले आणि मध्यरात्री सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले. पण या संपूर्ण चर्चेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची साधी एक ओळही नव्हती. NEET पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारचा विचार आहे. मोदी सरकारची ही मोठी खेळी मानली जाते.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा?

उपोषण सोडताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकारने अवाक्षरही काढले नाही हे विशेष. त्यामुळे सरकार आंदोलनातील हवा काढून हा मुद्दा तडीस नेण्याचा प्रयत्नात असल्याचा संघटनांचा आरोप आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी सरकारकडून कोणतेही तातडीचे आश्वासन देण्यात आले नाही. या विषयावर संसदेत चर्चा होईल, मात्र राजीनामा कधी होईल याविषयी सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले.

आपल्यापुढे यावेळी दोन पर्याय होते. उपोषण आणखी काही आठवडे सुरू ठेवणे अथवा आंदोलन पुढे नेण्यासाठी स्वतःचे आरोग्य जपणे असे ते दोन पर्याय होते. अनेक समर्थकांनी त्यांना जिवंत राहून लढा सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. अखेर हा सल्ला मानत उपोषण सोडल्याचे वांगचुक म्हणाले.

वांगचुक यांचा सरकारला गर्भित इशारा

अभिजीत दिपके यांच्या पुढाकाराने सध्या दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकही एकवटले आहेत. इतक्यांदा पेपरफुटी झाली त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे विरोधकांसह आंदोलकांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींवर वांगचुक यांनी सरकारला गर्भित इशारा दिला आहे. जर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. तर त्यात विद्यार्थ्यांचे नुकसान नव्हे सरकारचे नुकसान होईल. सरकारने वेळीच निर्णय घेऊन हा वाद शक्य तितक्या लवकर संपवावा असा सल्ला द्यायलाही वांगचुक विसरले नाहीत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in