• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?

August 24, 2026 by admin Leave a Comment


साखरेचा भाव 75 रुपयाला भिडताच आता सर्वसामान्यांचा पारा चढला आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही होत नसल्याची ओरड आहे. साखरेच्या वाढत्या दराने कारखानदार आणि व्यापारी खिसा भरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोघांच्या मिलीभगत मधून साखरेची साठेबाजी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. शेतकरी प्रतिनिधींना तुकाराम मुंढे यांची आठवण झाली आहे. सरकारने तुकराम मुंढे यांच्याप्रमाणे राज्यातील कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाकल्यास साखरेचे साठे बाहेर येतील, अशी भूमिका प्रतिनिधींनी घेतली आहे. पंढरपूर येथे आज सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ही भावना व्यक्त करण्यात आली.

पुढील पाच वर्षे पुरेल इतका साठा

देशातील व्यापाऱ्यांची गोडाऊन तपासल्यास पुढील पाच वर्षे साखर पुरेल इतका साठा सापडेल असा खळबळजनक दावा शेतकरी संघटना प्रतिनिधी दीपक भोसले यांनी केला आहे. साठेबाजांवर कारवाई करायची सोडून सरकार पुढच्या महिन्यात 10 लाख टन साखर आयात करत आहे, त्यावर त्यांनी टीका केली. हा डाव हाणून पाडायचा आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. उत्पादित साखर आणि वितरीत साखरेच्या तफावतीवरही प्रतिनिधींनी बोट ठेवले आहे.

साखरेच्या साठेबाजीवर सडकून टीका

साखरेचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला त्याचा फायदा होणार नसेल तर याबद्दल संशय घ्यायला वाव आहे. महिन्याला वीस लाख टन साखरेचा कोटा दिला जातो. याचा अर्थ असा होतो त्यातून दोन अर्थ निघतात एक तर साखरेची टंचाई असे बसून भरमसाठ साखर साठवून व्यापार्‍यांनी विकायची आहे. साखर साठवून ठेवायची आणि चढ्या दराने विकायची आहे. साखरेचे दर वाढवून काही लोक पैसे कमावतात याची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

शेजारच्या देशात साखरेचे दर स्थिर आहेत. तीन लाख टन साखर देशाबाहेर गेली असेल तर गृहमंत्री, अन्न व नागरी पुरवठा काय करत होते. प्रत्येक कारखान्याकडे 15 ते 20 टक्के साखर शिल्लक आहे. कारखान्यांनी एफआरपी दिली म्हणजे ते काही उपकार करत नाही. 30 लाख टन इथॅनॉलला साखर वापरली गेली. इथेनॉलचा आणि साखर दरवाढीचा काही संबध नाही. येणाऱ्या सिझनमध्ये साखरेचे दर वाढविले नाहीत तर अजून भाव वाढतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

साखर आयातीला विरोध

परदेशातून साखर आयातीला रयत क्रांती संघटनेचा व शेतकरी संघटनांचा विरोध असून निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन उभ करू असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व साखर नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांनी दिला आहे. साखर आयातीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रतिनिधी आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?
  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in