• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घर सजवताना सावधान! ‘या’ 5 चित्रांमुळे वाढू शकतो वास्तुदोष; जाणून घ्या सविस्तर

May 29, 2026 by admin Leave a Comment


Vastu Tips : घर सुंदर आणि आकर्षक दिसावे यासाठी अनेकजण भिंतींवर विविध प्रकारची पेंटिंग्स आणि सजावटीची चित्रे लावतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक चित्रातून विशिष्ट ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे घर सजवताना फक्त सौंदर्याचा विचार न करता वास्तुचे नियमही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जाणून घेऊया अशी कोणती 5 चित्रे आहेत जी घरात लावणे अशुभ मानले जाते आणि त्याऐवजी कोणती चित्रे सुख-समृद्धी आणू शकतात.

1. युद्ध, भांडण किंवा हिंसाचार दर्शवणारी चित्रे

महाभारत युद्ध, तलवारी, मारामारी, रक्तपात किंवा कोणत्याही प्रकारच्या संघर्षाचे चित्र घरात लावणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते. अशी चित्रे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढवतात. त्यामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होते आणि किरकोळ कारणांवरूनही वाद होण्याची शक्यता वाढते.

2. बुडणारे जहाज किंवा नाव दर्शवणारी पेंटिंग

जर घरात किंवा कार्यालयात बुडणाऱ्या जहाजाचे, समुद्रात अडकलेल्या बोटीचे किंवा वादळातील दृश्याचे चित्र असेल तर ते आर्थिक नुकसानाचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अशा चित्रांमुळे व्यवसायात तोटा, पैशांची अडचण आणि प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा लोक मॉडर्न डेकोरेशन म्हणून अशी चित्रे लावतात, मात्र वास्तुनुसार ती नकारात्मक ऊर्जा वाढवणारी असतात.

3. वाळलेली झाडे, ओसाड जमीन आणि उजाड दृश्ये

वाळलेली झाडे, पानगळ झालेली वनस्पती, बंजर जमीन, उद्ध्वस्त इमारती किंवा ओसाड हवेली यांसारखी चित्रे निराशा आणि उदासीनतेचे प्रतीक मानली जातात. अशी चित्रे पाहिल्याने नकळत मनावर नकारात्मक परिणाम होतो. घरात सकारात्मकता आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कलाकृतींपासून दूर राहणे अधिक योग्य मानले जाते.

4. रडणाऱ्या किंवा दुःखी व्यक्तींची चित्रे

आजकाल मॉडर्न आर्टच्या नावाखाली दुःखी चेहरे, रडणारी व्यक्ती किंवा वेदना दर्शवणारी चित्रे घरात लावली जातात. वास्तुशास्त्रानुसार ही चित्रे मानसिक तणाव वाढवू शकतात. घरातील वातावरण सतत जड आणि उदास राहू शकते.

5. मावळत्या सूर्याचे चित्र

उगवता सूर्य ऊर्जा, नवीन सुरुवात आणि आशेचे प्रतीक मानला जातो. मात्र मावळत्या सूर्याचे चित्र जीवनातील स्थिरता कमी होणे, आळस आणि प्रगतीतील मंदी यांचे संकेत मानले जाते. अशी चित्रे घरात लावल्यास कामांमध्ये विलंब होणे, उत्साह कमी होणे आणि निर्णयक्षमता घटणे यासारखे परिणाम दिसू शकतात असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in