
सध्या पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतोय. याच पासामुळे त्या भागाताली नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चांगला पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आलेला आहे.
ताज्या माहितीनुसार कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. कोयना धरणाचे सहा दरवाजे एका फुटाने उघडले आहेत. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग होतोय.
म्हणूनच कृष्णा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीची पाणीपातळी वाढत असल्याने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणा धरण 84 टक्के भरले असून या वारणा धरणातून 7000 वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात होत आहे.
सध्या कोयना धरणातून 5 हजार 79 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कृष्णा, कोयना नदीकाठच्या गावातील ग्रामास्थांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यातआले आहे. पाण्याची आवक अशीच वाढली तर भविष्यात धरणाचे आणखी दरवाजे उघडले जाऊ शकतात.




Leave a Reply