
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव (बंडू जाधव) यांच्यावर तीव्र शब्दात हल्ला चढवला आहे. “कार्यक्रमाचे आयोजन करून संजय जाधव यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे,” असे जरांगे पाटील म्हणाले. निवडून आल्यामुळे जाधव यांना मग्रुरी आली असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आता अवकळा (अधोगती) लागल्याचा दावा त्यांनी केला.
जरांगे पाटील यांच्या मते, संजय जाधव आणि संजय शिरसाट यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अडचणीत सापडले आहेत. परभणी येथील कार्यक्रमाला विरोध दर्शवत, जरांगे पाटील यांनी मुंबईत याचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. “परभणी जिल्ह्यात ताकद वाया घालवणार नाही, याचा बदला मुंबईत घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. परभणी जिल्ह्यातील सीमा सील करण्यात आल्या असल्या तरी, मुंबईत आंदोलन करून या घटनेचे पडसाद उमटवले जातील, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Leave a Reply