
एक अशी अभिनेत्री होती जी फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून अचानक दूर गेली. 1995 नंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तिच्याबद्दल कोणतीही बातमी समोर आली नाही. कालांतराने लोक तिला विसरले आणि नवीन अभिनेत्रींनी तिची जागा घेतली. पण खरी कहाणी पडद्यामागे चालू होती. पैशाची टंचाई, एकटेपणा आणि सतत बिघडत चाललेल्या आयुष्याने तिला अशा मार्गावर ढकलले जिथून परतणे जवळजवळ अशक्य होते.
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री निशा नूर होती. १९८० च्या दशकात तिने तमिळ चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि लवकरच उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली. कमल हासन आणि रजनीकांत सारख्या मोठ्या कलाकारांसोबतही तिने काम केले. चित्रपटांमध्ये तिला मुख्यतः सहाय्यक भूमिका मिळाल्या, तरीही तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळाली. १९८० ते १९९५ दरम्यान त्यांनी सुमारे १७ चित्रपटांमध्ये काम केले आणि तिचे नाव सतत चर्चेत राहिले.
पण काळ बदलला आणि हळूहळू चित्रपटांच्या ऑफर्स कमी होत गेल्या. एक काळ असा आला जेव्हा तिच्याकडे कामच राहिले नाही आणि पैशाची कमतरता भासू लागली. मात्र फिल्मी जगातील झगमगाटाची सवय लागल्याने आणि जमा केलेली पूंजीही संपल्याने, काही लोकांनी तिला वेश्यावृत्तीचा मार्ग सुचवला. पैशाच्या गरजेपोटी तिने हा मार्ग स्वीकारला आणि हळूहळू ती त्या जगात अडकत गेली. या काळात तिचा फिल्म इंडस्ट्री आणि कुटुंबाशी संपर्क जवळजवळ संपला. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात आल्यानंतरही त्यांनी कुटुंबापासून अंतर ठेवले होते आणि नंतर संबंध पूर्णपणे तुटले.
साल २००७ मध्ये जेव्हा निशा नूर नागूर दारगाहबाहेर अत्यंत वाईट अवस्थेत आढळली, तेव्हा एका व्यक्तीने तिला ओळखले. त्यानंतर तिला एका संस्थेकडे नेले गेले, जिथे तिने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. तिने कबूल केले की चित्रपटांपासून दूर झाल्यानंतर ती वेशा व्यवसाय करू लागली होती. तपासात असेही समोर आले की ती एड्ससारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तिची स्थिती इतकी वाईट झाली होती की शरीर फक्त हाडांचा सांगाडा बनला होता. संस्थेने तिला रुग्णालयात दाखल केले आणि उपचार सुरू केले, पण आजार खूप पुढे गेला होता.
रुग्णालयातील उपचारांनंतरही निशा नूरच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि दाखल झाल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक बाब ही होती की तिच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणताही सदस्य तिचे शव घेण्यासाठी आला नाही. शेवटी ज्या सामाजिक संस्थेने तिची मदत केली होती, त्याच संस्थेने तिच्यावर अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडली. एकेकाळी मोठ्या कलाकारांसोबत पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेत्रीचे आयुष्य अशा रीतीने संपेल, हे कदाचित कोणालाही सुचले नसते.




Leave a Reply