• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

July 19, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते हजर आहेत. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

भागवत यांनी आपण हिटलर सारखे नाही हे मोदींना सांगावे…

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘मी काल नागपुरात होतो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र आहे. या संघाच्या होसबळेने कालच्या मे महिन्यात स्टेटमेंट दिलं. पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे. जो पाकिस्तान आतंकवादी घुसवतो. हल्ले करतो त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे. भागवतांना विचारलं तर म्हणतात बरोबर आहे. हम हिटलर जैसे नही है. अहो भागवत साहेब हिटलर सारखे नाही हे मोदींना सांगा. पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी आहे. मग वांगचुकसोबत का नाही करत? जो देश सैनिकांचे बळी घेतो त्याच्याशी चर्चा. आणि जो माणूस सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतो त्याच्याशी चर्चा नाही. अशी माणसं मिळत नाही. एवढा फौजफाटा का आणताय? पाक व्याप्त काश्मीरात घुसवा या फौजा.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जण विचारतात मेलोडी खाओ खुद जान जाओ. फिर मुझे बात करने की क्या बात है. मेलडी खाओ और खुद्द जान जाओ. तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. आम्ही देशभक्त आहोत. हिंदू आहोत. शेंडी जाणव्याचे हिंदू नाही. म्हणून भागवतांना विचारलं जे आज देशात सुरू आहे हे तुमच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र चालतं का. हे हिंदू राष्ट्र आहे? आम्हाला हे हिंदू राष्ट्र मान्य नाही.

आपल्याला सरकार बदलायचं आहे…

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘आता एक पोस्टर होतं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही शुल्लक गोष्ट आहे. हे पण एकदम शुल्लक आहे. हा लढा आता हे सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. एकच वचन द्या. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
  • ‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की…
  • Explainer : आता नेपाळचं व्हायरल घर, तेव्हा केदारनाथचं मंदीर, महाप्रलयात दोघेही शाबूत कसे? वाचा A टू Z
  • पैशासाठी अशा ठिकाणी जाऊ नका.. अर्चना पूरन सिंह यांना ‘लेटेंट’मध्ये पाहून भडकला प्रसिद्ध कॉमेडिअन
  • या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in