
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. काल जरांगे पाटील उपोषणाला बसले. जास्तीत जास्त मराठा समाजाने घरातून बाहेर पडून या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. अंतरवालीतून सुरू झालेल्या आंदोलनाला चौथं वर्ष सुरू झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या दहाव्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अंतरवालीत लोकांची गर्दी जमत आहे. पहाटे चार वाजेपर्यंत आंदोलक मोठ्या संख्येने येत जात होते. आज देखील मोठ्या संख्येने आंदोलक दाखल होणार असल्याची माहिती मिळतंय. जरांगे यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिला. विखे फडणवीसांची भाषा बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले.
अंतरवाली सराटीत जेवणासाठी आणि पार्किंगसाठी जागा कमी पडत असल्याने शेतकरी विजय तारख यांनी अर्धा एकरातील कपाशी उपटून काढली. अंतरवाली सराटीत जेवणासाठी आणि पार्किंगसाठी जागा कमी असल्याने शेतकरी विजय तारख यांनी अर्धा एकरातील कपाशी उपटून काढत जागा उपलब्ध करून दिली आहे. काल आंदोलकांना जागा नसल्याने अडचणी आल्या होत्या. यामुळे रात्रीतून ही कपाशी उपटून काढत जागा तयार करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी पहाटे 3 वाजेपर्यंत मराठा आंदोलकांची गर्दी. पहाटे 3 वाजता देखील आंदोलक मोठ्या संख्येने येत जात होते. तर शेकडो आंदोलक उपोषण स्थळासह आसपासच्या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे आराम करत होते. अनेक मराठा बांधव मुक्कामी, पुढील काही दिवस अंतरवालीतच थांबण्याच्या तयारीत आहेत.
त्यातच आज रविवार असल्याने काही जण अंतरवालीकडे निघाले आहेत. राज्यभरातून मराठा समाजाचे लोक अंतरवालीत दाखल होत आहेत. या येणाऱ्या लोकांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जात आहे. आपल्या काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून हे उपोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आली.
Leave a Reply