• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WTC 2027: बांगलादेशच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आकडे झपाट्याने बदलले, भारताचं टेन्शन वाढलं

August 16, 2026 by admin Leave a Comment

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं. या विजयामुळे मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेतील समीकरण बदललं आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने आता ती वाचवण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे आहे. कारण पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे, तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत जागा मिळवण्याचं समीकरण झपाट्याने बदललं आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यामुळे भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचे गणित अधिक रंजक आणि आव्हानात्मक झालं आहे. इतकंच काय तर बांगलादेशही अंतिम फेरीसाठी दावेदार ठरला आहे. त्यासाठी बांगलादेशचं गणित सोपं असणार आहे.

बांग्लादेश संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार?

बांग्लादेश संघाने 2025-2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवला आहे. त्यामुळे बांगलादेशची विजयी टक्केवारी 66.67 टक्के असून चौथ्या स्थानावर आहे. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला उर्वरित 7 सामन्यांपैकी किमान 4 सामने जिंकणे आवश्यक आहे.पाच सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 61.11 च्या आसपास राहील आणि टॉप 2 मध्ये स्थान मिळेल. बांगलादेशने 3 विजय आणि दोन सामने अनिर्णितराखले, तर विजयी टक्केवारी 57.40 टक्के होईल. अशा स्थितीत त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. भारत, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर गणित अवलंबून असेल.

A look at the current #WTC27 standings after Bangladesh’s stellar victory against Australia 👀

📝: https://t.co/TJt9cbipMe pic.twitter.com/STlrZu6ZUy

— ICC (@ICC) August 16, 2026

भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानावर असून विजयी टक्केवारी 48.15 आहे. त्यामुळे भारताला 9 पैकी किमान 7 सामने जिंकणं भाग आहे. तसेच एक सामना बरोबरीत सोडवावं लागणार आहे. असे केल्यास भारत 65 टक्क्यांची विजयी टक्केवारी सोडवू शकेल. भारताची श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-0 असा विजय मिळवणे भाग आहे. न्यूझीलंडमधील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला चांगली कामगिरी करून दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 4-1 किंवा 3-1 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in