
दिवसेंदिवस राज्यभरात अपघातांची संख्या वाढत चालली आहे. अनेक जण वाहतुकीचे नियम मोडतात, तर काही इतर लोकांच्या चुकीमुळे बळी जातात. अलीकडेच विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. अपघाताचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. या पुलावर बंदी असतानाही वाहनांची वर्दळ होत होती. याच वेळी टँकरचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
विरार पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या गाड्यांना बंदी असतानाही बेजबाबदार चालक फाटकातून जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अनेक वेळी वाहनांचे नुकसान होते. वाहतूकही खोळंबते. या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.
Leave a Reply