
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसातच डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. (Photo Credit : Bcci)
टीम इंडियाने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजला 270 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने लोळवलं होतं. भारताने तेव्हा विंडीजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)
टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 2018 मध्येही अशाच प्रकारे मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारताने तेव्हा अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं होतं. (Photo Credit : Bcci)
टीम इंडियाने बांगलादेशला 2007 साला बांगलादेशमध्ये लोळवलं होतं. भारताने मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशवर डाव आणि 239 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)
तसेच टीम इंडियाने 2017 साली नागपूरमध्ये आयोजित सामन्यात श्रीलंकेलाही मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. भारतीय संघाने तेव्हा श्रीलंकेवर डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला होता. (Photo Credit : PTI)




Leave a Reply