
टीम इंडियाने भले दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला असेल. पण सूर्यकुमार यादव हा चिंतेचा विषय बनला आहे. एकवेळचा हा टीमचा हुकूमी एक्का आता संघावर ओझ बनत चालला आहे. आयसीसी टी20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव दीर्घकाळ नंबर 1 पोजिशनवर होता. सूर्या मैदानात उतरला की हमखास धावा बनणार हा विश्वास असायचा. पण आता चित्र बदललं आहे. तशी स्थिती राहिलेली नाही. सूर्यकुमार यादव काल पंजाब किंग्स विरुद्ध पहिल्या चेंडूवर शुन्यावर आऊट झाला. मागच्या वर्षभरापासून सूर्यकुमार यादवचा धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अपवाद फक्त टी20 वर्ल्ड कप आधी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेचा.
टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवने फक्त एक अर्धशतक झळकवलं. टीम इंडियाचा सलामीच्या सामन्यात USA विरुद्ध संघर्ष सुरु असताना सूर्या विकेटवर उभा राहिला व संघासाठी महत्वाची अर्धशतकी खेळी केली. अन्य सामन्यात त्याने काही धावा केल्यात. पण त्यांची क्षमता, दर्जा लक्षात घेता तो अन्य सामन्यात फिकाच ठरला असं म्हणावं लागेल. 2024 मधील टी20 वर्ल्ड कप विजयानंतर सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कॅप्टन बनला. तेव्हापासून त्याचा धावांसाठी संघर्ष सुरु झाला. फक्त न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत त्याने तीन अर्धशतकं झळकवली. यात 196.74 च्या स्ट्राइक रेटने 242 धावा केल्या.
या सीजनमधील सूर्याचे आकडे काय आहेत?
भारताने जर टी20 वर्ल्ड कप जिंकला नसता तर सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील टी20 करिअरचा शेवटच होता. सूर्या टीम इंडियाकडून फक्त टी20 फॉर्मेटमध्ये खेळतो. सुदैवाने टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. त्याने पुढच्या 2028 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये आता तो पूर्वीचा सूर्या राहिलेला नाही याची आकडेच साक्ष देतायत. 16,51,6,33 आणि 0 ही त्याची पाच सामन्यातील कामगिरी आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 36 चेंडूत 51 धावा हीच त्याची त्यातल्या त्यात थोडी चांगली कामगिरी आहे. तीन वर्षांपूर्वी सूर्यकुमार यादवकडून 36 चेंडूत 51 धावा अशी अपेक्षा केली असती का? त्यावेळी तो त्याच्या करिअरच्या टॉपवर होता. पण आता सूर्याची जादू ओसरली आहे.
कुठले दोन प्लेयर सूर्याची जागा घेऊ शकतात?
आयपीएलच्या मागच्या काही सीजनमध्ये श्रेयस अय्यर, रजत पाटीदार यांनी दमदार प्रदर्शन केलय. आत्ताही त्यांची कामगिरी तशीच आहे. दोघांनी आपल्यातले उत्तम नेतृत्व गुण दाखवून दिले आहेत. सूर्याची जागा घेण्यासाठी हे दोन्ही प्लेयर सज्ज आहेत. श्रेयस अय्यर इतका चांगला खेळूनही त्याला भारताच्या टी20 संघात स्थान मिळत नाही. सूर्यकुमार आता 35 वर्षांचा आहे. त्याची जागा घेण्यासाठी अय्यर आणि पाटीदार हे दोन चांगले ऑप्शन्स आहेत.
Leave a Reply