• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Supriya Sule : शिवसेना कोणाची? खटला चालू असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील केसबद्दल सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

August 21, 2026 by admin Leave a Comment


काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाविकास आघाडीबद्दल एक मोठा दावा केला. 2014 मध्ये मविआचा प्रस्ताव होता. पण मी तो नाकारला. पण 2019 मध्ये मीच मविआ बनवण्याचा प्रस्ताव दिला. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘एकप्रकारे मविआचा कर्ता करविता मी आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता’ असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. 2014 ला नकार दिला. 2019 ला होकार दिला. त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, त्यांना विचारावं लागेल”

“महाराष्ट्रातले काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. पण एक चांगलं आहे, दिल्लीतली त्यांची मेन लीडरशीप काँग्रेस पक्षाची त्यांची माझ्याशी रोज गाठभेट होत असते. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, वेणूगोपाल, त्यांच्या मनात असं काही असेल असं मी मानत नाही. ते आम्हाला बैठकीला बोलावत असतात. महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाची काँग्रेस यांच्यात कदाचित सुसंवाद नसावा. म्हणून महाराष्ट्र आणि देशाच्या काँग्रेसच्या मतांमध्ये तुमच्या प्रश्नांमधून काहीतरी गॅप दिसतो” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांच्या पक्षाचा तो व्यक्तिगत प्रश्न

“आमची त्यांच्याबरोबर सुप्रीम कोर्टात लढाई सुरु आहे. आजही मी माझ्या मतावर ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाऊंडर मेंबर शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आमची केस इलेक्शन कमिशनला गेली. आमच्या संविधानानुसार, आमच्या संविधानात आमदार-खासदार काय म्हणतात त्यापेक्षा संघटना कोणासोबत आहे ते महत्वाचं आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील

“आठ सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडल्या. शरद पवार प्रत्येक सुनावणीला हजर होते. आठ सुनावण्या झाल्या. पवारसाहेब हजर होते. सुप्रीम कोर्टात आम्हाला सुनावणीची तारीख मिळत नाहीय. शरद पवार पक्षाची आम्हाला अरेंजमेंट करुन दिली आहे” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. “अजित पवार गटाविरोधात आमची कोर्ट केस चालू आहे. आमची लढाई ज्यांचा पक्ष आहे, त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आहे. त्यांना तो पक्ष मिळाल्यानंतर काय करायचं ते शरद पवार ठरवतील. ही संघटना आहे. कोणाची मालकी नाही. पक्ष चुकीच्या पद्धतीने पवार साहेबांकडून काढून घेतला. पवार साहेबांवर अन्याय झाला. नियम-कायद्यांमध्ये मनमानी चालत नाही. हा देश संविधानाने चालतो. ही नैतिकतेची लढाई आहे. ती लढाई व्यक्ती बरोबर नाही, प्रक्रियेविरुद्ध आहे. आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दम नाही. निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील . पण कोर्टात नाही जिंकू शकतं” असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in