
आयपीएल क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. आरसीबीने विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना गुजरातचा संघ 162 धावांवर बाद झाला. आरसीबीने हा सामना 92 धावांनी जिंकला. या विजयासह आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सलग दुसऱ्यांदा आरसीबी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे. तर गुजरात टायटन्सला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. आता क्वॉलिफायर 2 मध्ये हैदराबाद किंवा राजस्थानशी लढत होईल.
Leave a Reply