
पुण्यात काल काँग्रेसच्या युवा संघटन एनएसयुआय आणि भाजपाचे युवा संघटन एबीव्हीपी यांच्या राड्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता मोठी होती. अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले आणि त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले असे या सभागृहाचे वातावरण होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात मनुस्मृतीपासूनचे दाखले देत महिलांना भारतीय समाजात कसे दमनाला सामोरे जावे लागते याचा दाखले दिले.राहुल गांधी नेहमी पांढरा टीशर्ट परिधान करत असतात. त्यांनी प्रयागराज येथे राहुल गांधी यांनी गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर पुण्यात त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता.
या कार्यक्रमाला मुलांच्यापेक्षा मुलींची जास्त उपस्थिती आहे असे राहुल गांधी यांनी स्टेजवर येताच जाहीर केले आणि मुलींनी आपल्या मोबाईल फोनची फ्लॅश लाईट दाखवत त्यास दुजारो दिला.
राहुल गांधी यांनी या सोहळ्यात महिलांवरील समाजात होणारा दुजाभाव आणि मिळणारी 'सेकंड सिटीझन' म्हणून वागणूकीचे अनेक दाखले दिले, त्याला उपस्थितीत विद्यार्थींनी दुजारो दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोटा,डेहराडून आणि प्रयागराज नंतर पुण्यात या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक तरुणींना उपस्थित राहून आपल्या व्यथा व्यक्त केल्या आणि समाजात आपल्याला कशी वागणूक दिली जाते याचे कथन केले.




Leave a Reply