
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 7.8% आर्थिक वाढीचे कौतुक करत देशवासीयांचे अभिनंदन केले. जागतिक स्तरावर युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारताने ही प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले. या आव्हानांवर मात करत देशाने मिळवलेली ही वाढ देशाच्या सामूहिक शक्तीचे प्रतीक असल्याचे मोदींनी म्हटले.
एकीकडे देश प्रगती करत असताना, दुसरीकडे काही लोक “निराशेच्या गर्तेत बुडून खोट्याचा गजर करत चारही बाजूंनी निराशा पसरवत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. ही नकारात्मकता दूर करत देशाला पुढे जायचे आहे आणि यासाठी आत्मनिर्भर भारत बनणे अत्यंत आवश्यक आहे, असे मोदींनी अधोरेखित केले. स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल या मंत्रांचे महत्त्व सांगत, अनावश्यक परदेशी प्रवास टाळण्याचे आणि विवाह सोहळे परदेशात न करता वेड इन इंडिया संकल्पना स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. अनावश्यक सोने खरेदी टाळावी, असेही ते म्हणाले.
Leave a Reply