
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ईशान्य भारतात क्रिकेटचा विकास व्हावा यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून ईशान्य भारतात क्रिकेट अॅकॅडमीची सुरुवात केली आहे. मणिपूरमधील या इनडोअर क्रिकेट ॲकॅडमीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअली उद्घाटन केलं. (Photo Credit : Bcci)
आयसीसीचे विद्यमान सर्वेसर्वा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांची मणिपूरमध्ये क्रिकेट ॲकॅडमी सुरु करु करण्याची ही संकल्पना होती. या अॅकडमीच्या उद्घाटनाला जय शाह उपस्थित होते. (Photo Credit : Bcci)
ॲकॅडमीच्या उद्घाटनावेळेस जय शाह यांच्याव्यतिरिक्त बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास, सचिव देवजीत सैकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धुमल उपस्थित होते. (Photo Credit : Bcci)
मणिपूरमधील ही इनडोअर ॲकॅडमी आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशी आहे. या अॅकॅडमीत क्रिकेट सरावाव्यतिरिक्त इतर सुविधाही आहेत. या अॅकॅडमीत जिमही आहे. (Photo Credit : Bcci)
तसेच मणिपूर व्यतिरिक्त अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय आणि नागालँडमध्येही बीसीसीआयकडून इनडोअर क्रिकेट अॅकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. या सुविधांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईशान्य भारतातील खेळाडूंची कामगिरी उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. (Photo Credit : Bcci)




Leave a Reply