
राज्यातील सत्तांतरानंतर जुने प्रकल्प तपासण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकल्पांसाठी दिलेला सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी व्याजासह परत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकूण प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प शिंदे यांच्या काळातील, तर 3 प्रकल्प आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील होते. काही प्रस्ताव नियमांनुसार नसल्याचे तसेच सुधारित आराखडे वेळेत न सादर केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
Leave a Reply