• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या विधानावर खुलासा काय? थेटच म्हणाले…

August 25, 2026 by admin Leave a Comment


मी आता जास्त काम करू शकत नाही. आता नव्या पिढीलाच संधी दिली पाहिजे, असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरातील एका कार्यक्रमात केलं होतं. गडकरी यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. गडकरी राजकारण सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक तर्कवितर्कही लढवले जात होतेय. मात्र, आता नितीन गडकरी यांचा त्या विधानावर खुलासा आला आहे. माझं हे विधान लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या अनुषंगाने होतं, असा खुलासा करत गडकरी यांनी राजकारण सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण आलं आहे. नितीन गडकरी यांच्या कालच्या विधानाचा कोणताच राजकीय अर्थ नाहीये. त्या विधानाचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीये. नितीन गडकरी हे लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संदर्भाने बोलत होते. या ट्रस्टच्या उभारणीत नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी भागात एकल विद्यालय चालवलं जात आहे. या संदर्भाने गडकरींनी कालचं विधान केलं होतं. मी फक्त संस्था उभी करण्याचं काम केलं. पण संस्था वाढवण्याचं खऱ्या अर्थाने काम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. मी आता जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे या ट्रस्टच्या वाढीसाठी नव्या पिढीने पुढे आले पाहिजे. नव्या पिढीला संधी देऊन त्यांच्या अंगावर जबाबदारी दिली पाहिजे, असं गडकरी यांनी म्हटलं होतं, असं गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

केवळ आणि केवळ…

गडकरी यांचं विधान हे केवळ आणि केवळ ट्रस्टचं कामकाज आणि ट्रस्टच्या भविष्यातील नेतृत्वाशी संबंधित होतं. त्याचा काहीच राजकीय अर्थ नाहीये. शिवाय हा कार्यक्रम ट्रस्टचा होता. तो राजकीय नव्हता, असं गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

एकही गाव अंधारात नको

नागपूरच्या या कार्यक्रमात गडकरी यांनी विकास कार्याबद्दलही भाष्य केलं होतं. येणाऱ्या काळात विकासाचा परिघ वाढणार आहे. महाराष्ट्रातील कोणतंही आदिवासी गाव विजेपासून वंचित राहू नये. गावांमध्ये वीज असेल तर राज्यांचा विकास स्पष्ट दिसतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली होती. या टीममध्ये 65 सदस्य आहेत. त्यापैकी 51 नवीन चेहरे आहेत. भाजपमध्ये संघटनात्मक बदल झाल्यानंतर आता कॅबिनेटच्या विस्ताराचीही चर्चा रंगली आहे. नेमकं अशाच वेळी नितीन गडकरी यांचं हे विधान आल्याने त्याची राजकीय चर्चा सुरू झाली. मात्र, आता गडकरी यांच्या कार्यालयाने त्याचा खुलासा करत ते विधान केवळ ट्रस्टच्या कार्याशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चंद्रग्रहण, राखी नेमकी कधी बांधायची ?
  • किती रोमँटिक दिसतेय.., अभिनेत्रीच्या लाल ड्रेसमधील फोटोंवर चाहते फिदा, सौंदर्य पाहून…
  • Onion Price Hike : मोठी बातमी, कांदा झाला स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; किती किलोने मिळणार कांदा?
  • IND vs SL: दुसऱ्या कसोटीत जयस्वाल-फर्नांडोनंतर आणखी एका खेळाडूवर कारवाई, आयसीसीकडून शिक्षा
  • कांद्याने इतक्या वेळा पाडले सरकार, राजकारणाला किंमतींमुळे कलाटणी, कुणासाठी खतरे की घंटी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in