
वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभा केला. पण SRH ने ट्रेविस हेड (76) आणि हेनरिक क्लासेन (65) यांच्या इनिंगच्या बळावर मुंबईला हरवलं. या पराभवानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? समजून घ्या.
पॉइंट्स टेबलनुसार मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत 8 सामने खेळली आहे. त्यात 2 सामने जिंकले असून 6 सामना हरले आहेत. मुंबई इंडियन्सकडे फक्त 4 पॉइंट्स आहेत. आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 16 पॉइंट्सची आवश्यकता असते.
म्हणजे मुंबईला आपले सर्व उर्वरित 6 सामने जिंकावेच लागतील. तेव्हाच ते 16 पॉइंट्स पर्यंत पोहोचू शकतात. अजून एक पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
सध्या मुंबईचा नेट रन रेट -०.784 आहे. जो खूप खराब आहे. जर त्यांनी सर्व 6 सामने जिंकले आणि दुसऱ्या टीम्सचे सुद्धा 16 पॉइंट झाले तर निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल. मुंबईला केवळ जिंकून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. तरच रनरेट प्लसमध्ये येईल.
पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीम्सनी परस्परांना हरवणं आवश्यक आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना येणाऱ्या मॅचेसमध्ये जास्त पॉइंट्स मिळाले नाहीत तर ते मुंबईच्या पथ्यावर पडेल.




Leave a Reply