
अंतरवाली सराटीत रखरखत्या ऊन्हात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. ऊन्हाळ्याचे दिवस असून वरुन सूर्य आक ओकत आहे. मनोज जरांगे पाटील यांची काल राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती. काही वेळात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आश्वासनाचं पत्र घेऊन पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. संभाजीनगरहून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील रवाना झाले आहेत.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply