
आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं, या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं, अखेर त्यानंत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान दुसरीकडे राहुल गांधी हे पुण्यात येण्यापूर्वीच एनएसयू आणि अभाविपमध्ये चांगलीच जुंपल्याची पहयला मिळत आहे. शुक्रवारी रात्री जोरदार राडा झाला, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच आज आपण इतरही अनेक घडामोडी जाणून घेणार आहोत.
Leave a Reply