
1 मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालक यांना मराठी सक्ती करण्यात आली. यादरम्यान ऑगस्टपर्यंत रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला. मराठी सक्तीचा मुद्द्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका सरकारवर केली. राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात बैठकाही झाल्या. याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply