• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kitchen Vastu Tips : किचनमधील ‘या’ 5 गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष, संबंध थेट घराच्या समृद्धीशी

June 22, 2026 by admin Leave a Comment


Kitchen Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र (Vastu shastra in Marathi) हे प्राचीन काळापासून प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे. स्वयंपाकघर (Kitchen) घराचा महत्त्वाचा भाग आहे. याच कारणामुळे पंचभूतांवर आधारित वास्तूमध्ये स्वयंपाकघराबाबत विशेष नियम बनवण्यात आले आहेत. स्वयंपाकघर हे घराचा सर्वात पवित्र आणि शुभ भाग मानलं जातं. कारण त्यावर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं. वास्तुशास्त्र आणि हिंदू श्रद्धेनुसार, देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. घरात समृद्धी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा साठा कधीही संपू देऊ नये. जर हा साठा संपणार असेल, तर तो त्वरित पुन्हा भरला पाहिजे.

मीठ : स्वयंपाकघरात मीठ कधीही कमी होऊ नये. मीठला राहू, केतू आणि शुक्र या ग्रहांशी थेट संबंधित मानलं जातं. स्वयंपाकघरात मिठाच्या कमतरतेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. वास्तूनुसार, मिठाच्या कमतरतेमुळे वास्तू दोष वाढू शकतात आणि घरात धन-संपत्तीची कमतरता देखील निर्माण होऊ शकते.

हळद : हळद केवळ एक मसाला नाही, तर ती अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. हळदीचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला जातो. गुरू ग्रह हा भाग्य, समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह मानला जातो. स्वयंपाकघरात हळदीच्या कमतरतेमुळे गुरु दोष निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे शुभ कार्यांमध्ये अडथळे येतात आणि धनहानी होऊ शकते.

तांदूळ : शास्त्रांमध्ये तांदळाला अक्षत म्हटले आहे. याचा अर्थ, जे कधीही सडत नाही किंवा नष्ट होत नाही. तांदळाचा संबंध शुक्र ग्रह आणि संपत्तीची देवी, लक्ष्मीजी यांच्याशी जोडला जातो. स्वयंपाकघरातील भांड्यातील पूर्णपणे रिकामे तांदूळ हे घरात समृद्धी आणि भौतिक सुखसोयींचा अभाव असल्याचे सूचित करतात. यामुळे शुक्र ग्रह कमजोर होऊ शकतो आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

पीठ : पीठ हे घरातील मुख्य अन्न आहे. पीठ हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानलं जातं. पीठ संपल्याने प्रतिष्ठेवर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मोहरीचे तेल : स्वयंपाकात वापरले जाणारे मोहरीचं तेलही खूप महत्त्वाचं आहे. मोहरीचे तेल हे न्यायाचे देव शनिदेवांशी संबंधित आहे. स्वयंपाकघरातील मोहरीचं तेल अचानक संपल्यास शनिदेवांचा कोप किंवा शनिदोष होऊ शकतो. यामुळे घरातील सदस्यांच्या कामात अडथळे येऊ शकतात आणि अनावश्यक खर्च होऊ शकतो.

विशेष वास्तु टिप्स

जेव्हा या पाच वस्तू संपतील, तेव्हा त्या नवीन वस्तूंनी भरा. मीठ, हळद आणि तांदूळ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेला अन्नपूर्णा देवीचं छोटं चित्र किंवा मूर्ती ठेवायला विसरू नका. यामुळे घरात अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in