
Kunal Khavadya Dongar case: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे या तीन व्यक्तींचा समावेश आहे. या चांदगुडे परिवारातील दुरावा मृत्यूनंतरही कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मृत मुलगा कुणाल आणि आई संगीता यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर वडील मुरलीधर चांदगुडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार पार पडले. यानंतर संगिताच्या वडिलांनी म्हणजेच मुरलीधर यांच्या सासऱ्यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे.
सासऱ्यांनी सांगितली जावयाची चूक
कुणाल कड्यावर उभा असताना संगिता आणि पोलीस त्याला समजावत होते. त्यावेळी कुणालच्या वडिलांनी उगाचच घाई केली. ही घाईच त्यांना नडली. जर त्याने ती घाई केली नसती तर कदाचित ही घटना घडली नसती, असं संगिता याचे वडील बबनराव गाभूड यांनी कबूल केले आहे. कुणाच्याही कुटुंबात छोटे मोठे वाद हे होतच असतात, त्यामुळे असे वाद मनावर घ्यायचे नसतात. काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. काहीतरी घरगुती कारणांवरुनच मुरलीधरने कुणालवर आणि त्याच्या आईवर आरडाओरडा केला होता. त्यांवर प्रचंड रागावले होते. याच घटनेचा राग कुणालला आला होता. पण म्हणून ही किनार गाठू नये, असेही संगिताचे वडील म्हणाले.
मुरलीधर ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कामाल होते. कामानिमित्त ते अनेकदा 15 दिवस, कधी महिनाभर घराच्या बाहेरच असायचे, आई-वडिलांमधील सततचे वाद आणि वडिलांबाबतची नाराजी यामुळे कुणालने हे पाऊल उचलले का? त्या दोघांमध्ये काही टोकाचे वाद होते का? या दृष्टीनेही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुणालच्या काही मित्रांनी माहिती दिली की, “कुणालकडे आधीच ‘आयफोन’ असल्याने त्याला काही नव्या फोनची गरज नव्हती. तशी त्याची कधी मागणी ही नव्हती. तो अत्यंत हुशार आहे.
Leave a Reply