
नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर आरोप केलाय की, त्यांनी RSS आणि त्या संघटनेचे संस्थापक डॉ.के.बी.हेडगेवार यांची प्रशंसा करुन All India Services चे नियम मोडले आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलाय की, विश्वास नांगरे पाटील यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याआधी तुमची परवानगी घेतली होती का?. ऑल इंडिया सर्विसेज (कंडक्ट) नियमांचा हवाला देत काँग्रेसने दावा केलाय की, IPS अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात सहभागी होण्याआधी सरकारची परवानगी घेतली पाहिजे. असा प्रश्न विचारुन काँग्रेसला नांगरे पाटील यांनी अशी परवानगी घेतली होती का? हे जाणून घ्यायचं आहे. जर नाही, तर सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे का?.
“जे आयपीएस अधिकारी RSS, हिंदुत्व आणि आरएसएसचे संस्थापक के.बी. हेडगेवार यांचं कौतुक करतात त्यांची अशी भाषणं नियमांविरुद्ध आहे” असं काँग्रेसने म्हटलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय दृष्टया तटस्थ असलं पाहिजे आणि आपल्या पदाच्या हिशोबाने आचरण केलं पाहिजे असं All India Services सेसचे नियम सांगतात. नियमांनी अधिकाऱ्यांना कुठल्याही राजकीय विचारधारेशी जोडण्यास मनाई केली आहे. आरएसएस सारख्या संघटनेच्या मंचावर जाऊन त्यांचं कौतुक करणं हे नियमांचं उल्लंघन नाहीय का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम
हा मुद्दा फक्त एका अधिकाऱ्यापुरता मर्यादीत नाही. सिविल सर्विसेजची विश्वासहर्ता, राजकीय निष्पक्षतेचे संवैधानिक सिद्धांत आणि पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास याच्याशी संबंधित हे मुद्दे आहेत. सामाजिक विभाजनाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांचं उद्दातीकरण नव्हे, तर कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे असं दुसऱ्या एका पोस्टमध्ये विरोधी पक्षाने म्हटलं आहे.
रविंदर सिंगल यांची जागा घेणार आहेत
महाराष्ट्र कॅडरचे सम्मानित IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची मंगळवारी नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. 26/11 चे हिरो म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. नांगरे पाटील हे रविंदर सिंगल यांची जागा घेणार आहेत. त्यांची बदली महाराष्ट्र अँटी-करप्शन ब्यूरोमध्ये एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावर झाली आहे. 1997 बॅचचे अधिकारी नांगरे पाटील, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अतिरेक्यांचा मुकाबला करुन जे शौर्य दाखवलं होतं, त्यासाठी ओळखले जातात.
Leave a Reply