
वुमन्स टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध चिवट बॉलिंग केलीय. भारतीय गोलंदाजांच्या चिवट बॉलिंगसमोर बांगलादेशला 140 हा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला 137 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाने या मोहिमेत आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा विजय मिळवायचा असेल तर बांगलादेश विरुद्ध 6.85 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply