
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने भारताने श्रीलंकेत अपेक्षित कामगिरी केली आहे. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 150 धावांनी नमवलं. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताला पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली होती. त्यात दुसऱ्या डावात 193 धावांची भर घातली आणि 371 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांची गरज होती. पण श्रीलंकेला काही या धावांपर्यंत मजल मारता आली नाही.
भारताने विजयासाठी ठेवलेल्या 372 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात डळमळीत झाली. आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद झाले. निशान मदुष्का 6, लहिरू उदारा 16, कामिंदु मेंडिस 2 आणि पासिंदू सूरियाबंदारा खातंही खोलू शकला नाही. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 4 गडी गमवले होते. पण पाचव्या दिवशी कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि सोनल दिनुषा यांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवलं.
Leave a Reply