• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: तिसऱ्या सामना जिंकण्यासाठी श्रेयसला उचलावे लागणार मोठं पाऊल; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये ‘तो’ एक निर्णय घ्यावाच लागणार

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघ तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तिसरा सामना जर भारतीय संघाने जिंकला नाही तर मालिका गमावण्याचा धोका आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात 191 धावांचे लक्ष्य ठेवूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. तिसरा सामना उद्या, 7 जुलै रोजी ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. तिसरा सामना खेळण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा एका खेळाडूला संघात स्थान देणार नाही याची शक्यता नाकारु शकत नाही.

मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला 191 धावांचे लक्ष्य गाठणे आव्हानात्मक ठरत होते. पण रवी बिश्नोईच्या एका षटकाने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. 16 व्या षटकाच्या अखेरीस इंग्लंडला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती. बिश्नोई 17 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि त्याने दोन नो-बॉलसह 29 धावा दिल्या. यापूर्वीही त्याने नो-बॉल टाकले होते. तीन वेळा तीच चूक करणे हे शिस्तीचा अभाव दर्शवते. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनेही कबूल केले की हे षटक सामन्याचे कलाटणी देणारे ठरले. त्यामुळे, फिरकी गोलंदाजाला पुढच्या सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

रवी बिश्नोईच्या जाण्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि प्रिन्स यादव यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. खेळपट्टीनुसार संघ व्यवस्थापन अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल करू शकते. जर फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असेल, तर सुंदर खेळताना दिसू शकतो. तो फलंदाजीचा एक पर्यायही उपलब्ध करून देतो. याशिवाय, जर परिस्थिती वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असेल, तर प्रिन्स यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 22 धावा देऊन 3 बळी घेतले होते.

भारताला इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. आयर्लंडकडून झालेल्या मानहानीकारक मालिका पराभवानंतर, त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. पराभव झाल्यास नवीन कर्णधार श्रेयस अय्यरभोवतीचे प्रश्न आणखी तीव्र होतील. त्याने सूर्यकुमार यादवची जागा घेतली आहे. त्याच्या कर्णधारपदी भारताने 2026 च्या टी20 विश्वचषकासह 52 पैकी 42 सामने जिंकले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऐन पावसात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर
  • IND vs SL U19 ODI : वॉलचा मुलगा सेम वॉल सारखा खेळला, कठीण प्रसंगात अन्वय द्रविडची श्रीलंकेविरुद्ध तुफान बॅटिंग
  • फक्त एका वाक्यामुळे हेमा मालिनी बनल्या चाहत्यांच्या ड्रीम गर्ल, काय होतं ते वाक्य? वाचून…
  • आता शारीरिक सुखाची मागणी होत नाही, तर डायरेक्ट…, अभिनेत्रीकडून इंडस्ट्रीचं काळं सत्य उघड
  • अपघातग्रस्तांना मदतीचा हात, यूएईच्या उद्योगपतीने दिले 2.6 कोटी, पीडित कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in