
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होईल. या मालिकेसाठी भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघात निवड झाली आहे. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झालेला बुमराह तेव्हापासून संघाबाहेर आहे (Photo: PTI)
दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला जसप्रीत बुमराह अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघात असेल. या मालिकेतील पहिला सामना बुमराहसाठी आणखी खास आहे. कारण जर बुमराहने या सामन्यात विकेट घेतली, तर तो आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठेल. (Photo: PTI)
बुमराहने या सामन्यात एक बळी घेतला, तर तो टी20 फॉरमॅटमध्ये 350 बळी पूर्ण करेल. यासह, तो हा पराक्रम करणारा तिसरा भारतीय खेळाडू बनेल. बुमराहच्या आधी केवळ दोन भारतीय गोलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. त्यामध्ये युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. (Photo: PTI)
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा भारतीयांचा विक्रम स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 343 सामन्यांमध्ये 396 बळी घेतले आहेत. त्याच्या खालोखाल भुवनेश्वर कुमार असून त्याने 332 सामन्यांमध्ये 363बळी घेतले आहेत. (Photo: PTI)
बुमराहने आतापर्यंत 283 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 349 बळी घेतले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बळी घेऊन तो 350 बळींचा टप्पा गाठेल. यासह तो चहल आणि भुवनेश्वर यांच्या यादीत सामील होईल. (Photo: PTI)




Leave a Reply