• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Alert : घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात थेट गारांच्या पावसाचा अलर्ट; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली

May 24, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतासह देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवस उत्तर भारत आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, 29 मेपासून काही भागांमध्ये तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात 29 आणि 30 मे रोजी गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात एक दिवस आधी अशाच हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू तसेच ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

ईशान्य भारतात पावसाचा इशारा

गेल्या 24 तासात मध्य भारत, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतात कमाल तापमान 43 ते 47 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. तर ईशान्य भारत, पश्चिम हिमालयीन क्षेत्र आणि पश्चिम-दक्षिण भारत वगळता इतर भागांमध्ये तापमान 40 ते 43 अंशांच्या दरम्यान राहिले. आता ईशान्य भारतात 24 आणि 25 मे रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी आसाम आणि मेघालयातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मेदरम्यान अरुणाचल प्रदेशात, 24 ते 29 मेदरम्यान आसाम-मेघालयात आणि 24, 25, 29 व 30 मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार

दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 24 ते 28 मेदरम्यान केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि अंतर्गत कर्नाटकमध्येही विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि तेलंगणामध्येही अशाच प्रकारचे वातावरण राहणार आहे. काही भागांत जोरदार वारे आणि वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये 24 मे रोजी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कसे असेल उत्तर भारतातील हवामान?

उत्तर-पश्चिम भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 24, 25 आणि 28 ते 30 मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 24 मे रोजी आणि हिमाचल प्रदेशात 29 मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 28 आणि 29 मे रोजी, तर पश्चिम उत्तर प्रदेशात 29 आणि 30 मे रोजी गारपीट होऊ शकते. या काळात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
  • चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in