
आयपीएल स्पर्धेच्या 37व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात खरं तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे संघाने 158 धावांपर्यंत मजल मारली. पण त्याची अर्धशतकी खेळीमुळे एक नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo: IPL/BCCI)
चेन्नई सुपर किंग्सने 37 धावा असताना चार महत्त्वाचे विकेट गमावले होते. त्यामुळे एक बाजू सावरून धरण्याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडला पर्याय नव्हता. त्याने अर्धशतक पूर्ण करण्याठी 49 चेंडू खेळले. ही खेळी बरीच संथ होती. पण ऋतुराजचा फॉर्म पाहता त्याच्यासाठी योग्यच ठरली म्हणा.. कारण त्याने या स्पर्धेवतीने सात सामन्यात 30 धावांचा पल्लाही ओलांडला नव्हता. (Photo: IPL/BCCI)
कर्णधार ऋतुराज गायकवाडची या स्पर्धेतील सर्वात संथ अर्धशतक खेळी म्हणून नोंद झाली आहे. या पर्वात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता त्याचा नकोसा विक्रम ऋतुराज गायकवाडने मोडला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतक नावावर केलं. (Photo: IPL/BCCI)
सर्वात संथ अर्धशतकी खेळीचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर असून त्याने 2010 मध्ये 53 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मॅथ्यू हेडनने 2009 मध्ये 51 चेंडूत, मुरली विजयने 2013 मध्ये दोनदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर स्मिथने 2014 मध्ये 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आता ऋतुराज गायकवाड या यादीत बसला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. (Photo: IPL/BCCI)
आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरू झाल्यापासून संथ गतीने अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2023 पासून आतापर्यंत पहिल्यांदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं गेलं. त्यामुळे हे अर्धशतक ऋतुराज गायकवाडच्या चाहत्यांना नकोसं झालं आहे. (Photo: IPL/BCCI)




Leave a Reply