
भारतीय रेल्वे म्हणजे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेबाबत अनेक रंजक गोष्टी लोकांना माहिती असतात, तर अनेक गोष्टी अजूनही अनेकांसाठी नवीन असतात. देशात सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.
सध्या भारतात दररोज सुमारे 13,523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी, एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.
ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.
आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1,200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.




Leave a Reply