• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs PAK: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, बॉलचे दोन तुकडे करून खेळाडूंना वाटले!

August 20, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ओली रॉबिनसह आणि जोश टंग यांनी पाकिस्तान फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 171 धावांवर बाद झाला. पण पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर लगेचच चेंडू दोन भागात कापला गेला. त्याचा एक भाग ओली रॉबिनसनला दिला गेला. तर दुसरा भाग जोश टंगला दिला. असं करण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चेंडू मध्यभागी कापण्याची काय गरज होती? नेमकं काय घडलं? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेंमींच्या डोक्यात फिरत होते. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

चेंडू मधून कापण्याचं कारण की…

क्रिकेटमधील प्रथेनुसार, पाच विकेट घेतल्यानंतर गोलंदाज चेंडू आपल्यासोबत मैदानाबाहेर घेऊन जातो आणि त्याच्याकडेच ठेवतो. हेडिंग्ले कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी मात्र दोन गोलंदाजांनी अशी कामगिरी केली. ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 5 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. ओली रॉबिनसनने 18 षटकं टाकली, त्यापैकी 3 निर्धाव राहिली. तर 51 धावा देऊन 5 विकेट काढल्या. दुसरीकडे, जोश टंगने 9.1 षटकात 46 धावा देत 5 विकेट नावावर केल्या. दोघांच्या नावावर पाच विकेट असल्याने चेंडू घेऊन कोण जाणार? हा प्रश्न होता. मग काय चेंडू दोन भागात कापला गेला. एक भाग रॉबिनसनला आणि दुसरा भाग जोशला दिला गेला.

𝑺𝒉𝒂𝒓𝒊𝒏𝒈 𝒕𝒉𝒆 𝒔𝒑𝒐𝒊𝒍𝒔 🎯

Five wickets apiece and half a ball apiece for Ollie Robinson and Josh Tongue 🎉 pic.twitter.com/18j4b6RQmG

— ICC (@ICC) August 20, 2026

काय म्हणाला जोश टंग?

जोश टंगने या प्रकारानंतर सांगितलं की, ओली रोबिनसन म्हणाला की आपण चेंडू दोन भागात वाटून घेऊयात. त्यानंतर ग्राउंड स्टाफने चेंडू दोन भागात बरोबर कापला. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. आता अर्धा तुकडा मी माझ्याजवळ ठेवणार आहे. हे खूपच नवीन काहीतरी होतं आणि मी कधीच विसरणार नाही.

इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 20 वर्षानंतर एका डावात 5-5 विकेट घेण्याचा कारनामा दोन गोलंदाजांनी केला आहे. विशेष म्हणजे 2006 साली झालेला सामनाही पाकिस्तानविरुद्ध होता. तेव्हा स्टीव्ह हार्मिसन आणि माँटी पनेसरने प्रत्येकी 5 विकेट घेतल्या होत्या. पण तेव्हा चेंडू काही दोन भागात कापण्याचा प्रकार घडला नव्हता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in