• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : राष्ट्रीय सुरक्षेला ‘धुरंधर’चा धोका? हायकोर्टाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश, काय आहे प्रकरण?

May 20, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाविरोधात एका लष्करी जवावाने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला आणि सेन्सॉर बोर्डाला (CBFC) या चित्रपटातील काही दृश्यांबद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘धुरंधर’मध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून या याचिकेत राष्ट्रीय सुरक्षासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्याने उपस्थित केलेले मुद्द विचार करण्यायोग्य आहे आणि या प्रकरणाकडे योग्य पद्धतीने लक्ष देणं आवश्यक असल्याचं कोर्टाने म्हटलंय.

नेमकं काय घडलं?

‘धुरंधर’ या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर संबंधित लष्करी जवान सुनावणीदरम्यान स्वत: न्यायालयात उपस्थित होता. यावेळी जवानाने असा दावा केली, या चित्रपटातील काही दृश्ये, ज्यामध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या डावपेचांचं, कार्यपद्धतींचं आणि संवदेनशील ठिकाणांचं अत्यंत स्पष्टपणे चित्रण केलं आहे. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. याचिकाकर्त्याने असाही युक्तीवाद केला की, जरी या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं जात असलं तरी त्यातील अशी दृश्ये राष्ट्राच्या सुरक्षेच्या हिताची मानली जाऊ शकत नाहीत. हे चित्रण राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करतं.

न्यायालयाने काय म्हटलंय?

याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने टिप्पणी केली की, चित्रपटांचा प्रभाव फक्त मनोरंजनापर्यंतच मर्यादित राहत नाही. यावेळी खंडपीठाने उदाहरण देत सांगितलं की जर एखाद्या चित्रपटात आत्महत्येपूर्वी ऑनलाइन सर्चसारखे सीन्स सविस्तरपणे दाखवले गेले, तर त्यावरून प्रश्न उपस्थित होतो की असं चित्रण योग्य आहे का? चित्रपटांच्या प्रभावाला नाकारलं जाऊ शकत नाही. याचसाठी सेन्सॉरशिप आणि मार्गदर्शक तत्त्वांची गरज असते.

याचिकाकर्त्याने यावेळी न्यायालयाला असंही कळवलं की, त्याने 23 मार्च 2026 रोजी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्ड यांना चित्रपटातील अनेक दृश्यांवर आक्षेप घेत एक सविस्तर निवेदन पाठवलं होतं. त्याचप्रमाणे या मुद्द्यावरून त्याने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. कोर्टाने दिलेल्या आदेशात असं म्हटलंय की, सक्षम प्राधिकरणाने या प्रकरणाचा विचार करावा आणि आवश्यक वाटल्यास सुधारात्मक कारवाई करावी. त्याचसोबत घेतलेला निर्णय याचिकाकर्त्याला कळवावा.

रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ हा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 1307.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहेत. आतापर्यंत त्याची भारतातील कमाई 1146.35 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 1700 कोटी रुपयांवर गेला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
  • संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in